मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामिनावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खान याला क्रुझ रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. गेले १७ दिवस आर्यन तुरुंगवासात आहे. एनसीबीनं ३ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक केली होती. मात्र बुधवारी याप्रकरणी सुनावणी होणार असून आर्यनला बेल मिळणार की त्याचा तुरुंगवास वाढ हे समजणार आहे. परंतू, आर्यनला जामीन मिळावा यासाठी महाराष्ट्र भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट करुन आर्यनच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे.
राम कदम यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. 'प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे.'
प्रार्थना आहे की आज #आर्यनखान ला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची #ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती #महाराष्ट्रसरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) October 20, 2021
आर्यन खान प्रकरणाबाबत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर भाजप पेटून उठली आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी प्रश्न विचारला की, ड्रग माफियांशी महाराष्ट्र सरकारचे काही संबंध आहेत का? शिवसेना नेते आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. भाजप कधीच आर्यन खान किंवा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. आम्ही शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नाही. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
या धोकादायक प्रकरणात महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांच्या विरोधात उभे राहील अशी अपेक्षा होती, पण खेळ त्यांच्यावरच उलटला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आगामी निवडणुकीसाठी या प्रकरणाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरातील तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रगच्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र येऊ शकतात का? बरं, बदललेल्या भारताचा संदेश नक्कीच गेला आहे की कायद्यापुढे कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत.
#ड्रग्समाफिया च्या विरोधात उभे राहतील मात्र #वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. #महबूबामुफ्ती यांनी देखील याचा आगामी निवडणुकीसाठी याचा पुरेपूर उपयोग केला.जी ड्रग्सची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते त्या विरोधात सर्व पक्ष आणी मानव जात एकत्र का येऊ शकत नाहीत. हे दुःख आहे
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) October 20, 2021
आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असंही राम कदम यांनी म्हटलं.
प्रश्न उद्भवतो की ज्याप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि इतर मंत्री पत्रकार चर्चा करून एनसीबीवर सतत टीका करत आहेत. ज्या प्रकारे एनसीबी अधिकाऱ्यांची बदनामी करत आहे आणि त्यांचा अपमान करत आहे. त्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण सरकार ड्रग माफियांच्या पाठीशी उभे आहे.
ड्रग माफिया आणि महाराष्ट्र सरकार यांचा काय संबंध आहे हे सांगत राम कदम यांनी एक व्हिडिओ जारी केला. महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांना ड्रग माफियांकडूनही वसुली मिळत आहे का? कदाचित याच कारणामुळे ते ड्रग माफियांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, अशी टीकाही राम कदमांनी केली आहे.