मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केलं.
महाडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राजन साळवी, सुनिल शिंदे, तृप्ती सावंत, प्रकाश सुर्वे या आमदारांनी सहभाग घेत जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील अपघातात मृत पावलेल्या आणि अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन, राष्ट्रीय महागार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या सुप्रीम पनवेल इंदापूर टोल्वेज प्रा. लि. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली.
सुप्रीम पवनेल इंदापूर टोल्वेज प्रा. लि. या कंपनीला जानेवारी २०११ रोजी महामार्गाचं काम देण्यात आलं होतं. जे जून २०१६ पर्यंत पूर्ण करायचं होतं. पण ते काम अजूनही पूर्ण झालेलं नाही.
हे काम अर्धवट राहिल्यानं या मार्गावर आतापर्यंत २ हजार ८६३ अपघात झाले आहेत. ज्यात ६१५ व्यक्तींना जीव गमवावा लागला असून २ हजार १४६ गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती आमदार गोगावले यांनी दिली.