Advertisement

मुंबईचा थरारक विजय


 मुंबईचा थरारक विजय
SHARES

रोहतक - 41 वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईने यंदाच्या रणजी हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. शेवटपर्यंत थरारक झालेल्या पहिल्या लढतीत मुंबईने तामिळनाडूवर दोन गडी राखून मात केली.
तिसऱ्या दिवशी तामिळनाडूने विजसासाठी दिलेल्या 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मात्र एकीकडून इतर फलंदाज धडाधड माघारी फिरत असताना अभिषेक नायरने एक बाजू लावून धरली. नायरने नाबाद 45 धावांची खेळी करत मुंबईला थरारक विजय मिळवून दिला.
तीन दिवसांत आटोपलेल्या या लढतीत मुंबईने तामिळनाडूला पहिल्या डावात 87 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर मुंबईला 176 धावाच जमवता आल्या. पहिल्या डावात 89 धावांची आघाडी घेतल्यावर मुंबईने दुसऱ्या डावातही तामिळनाडूची दाणादाण उडवली. सहा बळी टिपणाऱ्या धवल कुलकर्णीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने तामिळनाडूचा दुसरा डाव 185 धावांवर गुंडाळला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा