गणेशोत्सव काळात मुंबईकरांसाठी विशेष बस सेवा चालवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मुंबईतील विविध ठिकाणच्या नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या बस चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान, बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी गणेशोत्सवानिमित्त बेस्ट उपक्रमाने सवलतीची योजना सुरू केली आहे. चलो ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना ७९९ रुपयांची सुपर सेवर योजना ७५ टक्के सवलतीत म्हणजेच १९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे.
बेस्टनं सुरू केलेली ही योजना ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार असल्याची माहिती उपक्रमाने दिली. यामध्ये २० रुपयांच्या ५० फेऱ्यांचाही समावेश असणार आहे.
हेही वाचा