रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहेत. या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेनं जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मंगळवारी रात्री हा अपघात झाला. वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार असल्यानं प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.
त्यात रेल्वेचे ३ कामगार जखमी झाले व एकाचा मृत्यू झाला. ही मशिन बाजूला करण्याचं काम सुरू असून त्यासाठी २ ते ३ तास लागणार आहेत. त्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.