मुंबई रिक्षावाले युनियनने सरकारला डिसेंबरची डेडलाईन देऊन मुंबई महानगर क्षेत्रात पहिल्या दीड किमीसाठी रिक्षा भाडे 23 रुपयांवरून 25 रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे मुंबईतील रिक्षाचालक आता उच्च न्यायालयात जाणार आहेत.
खटुआ समितीच्या सूत्रानुसार, ग्राहक किंमत निर्देशांक, रिक्षा खरेदीचा खर्च, रिक्षाच्या दुरुस्तीचा खर्च, विमा आणि विविध कर लक्षात घेऊन रिक्षाचे भाडे ठरवले जाते.
ऑक्टोबर 2022 मध्ये रिक्षाचे भाडे 21 रुपयांवरून 23 रुपये करण्यात आले होते, मात्र आता ते 23 रुपयांवरून 25 रुपये करण्याची मागणी होत आहे. युनियनचे अध्यक्ष थंपी कुरियन यांनी सांगितले की, रिक्षाचालक युनियन उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा