मुंबईकरांसाठी अानंदाची बातमी. मुंबई ते कोल्हापूर हा साडेसहा तासांचा प्रवास अाता अवघ्या सव्वा तासात होणार अाहे. थांबा, जास्त विचार करू नका. हा प्रवास रस्त्यामार्गे नव्हे, तर विमानाने शक्य होणार अाहे. २४ डिसेंबरपासून मुंबई ते कोल्हापूर ही विमानसेवा सुरू केली जाणार अाहे. त्यामुळे फक्त सव्वा तासाचा प्रवास करून मुंबईकरांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेता येणार अाहे. खासदार संभाजी राजे यांनी अापल्या ट्विटरवरून ही माहिती दिली.
या विमान प्रवासासाठी विमानातील एकूण सीटच्या ५० टक्के सीट्ससाठी खास अाॅफर ठेवण्यात अाली अाहे. सर्वात अाधी जे तिकीट बुक करतील, त्यांना अवघ्या अडीच हजारांत हा प्रवास करता येणार अाहे.
कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मुंबई व दिल्ली येथे पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.गेल्याच आठवड्यात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री @Ashok_Gajapathi यांची सुद्धा भेट घेतली होती. ही सेवा सुरू करण्याबद्दल धन्यवाद @Ashok_Gajapathi & @Dev_Fadnavis 3/n@abpmajhatv pic.twitter.com/a6nkU8gx0R
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 13, 2017
२४ डिसेंबरपासून सुरू होणारी ही विमानसेवा आठवड्यातून तीन वेळा म्हणजे मंगळवार, बुधवार आणि रविवार अशा तीन दिवशी असणार अाहे. या दिवशी मुंबईहून दुपारी १.१५ वाजता विमान उड्डाण घेईल अाणि ते दुपारी २.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल. त्याच दिवशी हे विमान कोल्हापूरहून ३.२५ वाजता झेप घेईल अाणि मुंबईत दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.
पंतप्रधानांच्या उड्डाण योजनेंतर्गत राज्यात अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू केली जाणार अाहे. त्यात नांदेड ते मुंबई, नांदेड ते हैदराबाद, नाशिक ते पुणे, नाशिक ते मुंबई, कोल्हापूर ते मुंबई, जळगाव ते मुंबई आणि सोलापूर ते मुंबई अशा विमानसेवांचा समावेश असेल.