Advertisement

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवाशांचं आगमन

वंदेभारत अभियानांतर्गत ४०० विमानांनी आतापर्यंत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवासी आले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १८ हजार २६४ आहे.

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवाशांचं आगमन
SHARES

वंदेभारत अभियानांतर्गत ४०० विमानांनी आतापर्यंत मुंबईत ५४ हजार ७०७ प्रवासी आले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १८ हजार २६४ आहे. आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील १८ हजार ७९८ प्रवासी असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या १७ हजार ६४५ इतकी आहे.३१ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आणखी ४८ विमानांनी प्रवाशी मुंबईत येणं अपेक्षित आहे. (vande bharat mission july update in mumbai airport)

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.

‘या’ देशातून आले प्रवासी

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग,  कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्यूयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा - मुंबईत 'ह्या' इमारती केल्या सील

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचं काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचं काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जात आहे तसंच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि.   यांच्या समन्वयाने केलं जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा