१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसानं ऑगस्टमध्ये जोरदार बँटिग सुरू केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा (Mumbai Rains) जोर कायम आहे. १५ ऑगस्टला म्हणजे विकेंडला राज्यात आसमानी संकट असणार आहे, हवामान विभागानं यासंदर्भात अलर्ट जाहीर केला आहे.

येत्या पाच दिवसात कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्यानं जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : सुंदर, मनमोहक ब्रम्हकमळ…

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात ५ जिल्हे वगळता सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांश धरणं तुडुंब भरून वाहत आहेत.

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसानं मुंबईची तुंबई झाली होती. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. यामुळे अनेक नागरिक बस, ट्रेनमध्ये अडकले होते. त्यांच्यासाठी NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.


हेही वाचा

१५ आॅगस्टला लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…

अंधेरीत सापडलेल्या बिबळ्याची नैसर्गिक अधिवासात सुटका

पुढील बातमी
इतर बातम्या