Advertisement

विनामास्क फिरणाऱ्या १४,१०० मुंबईकरांना दंड

लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्क लावा आणि गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

विनामास्क फिरणाऱ्या १४,१०० मुंबईकरांना दंड
SHARES

लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्क लावा आणि गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मात्र, तरिही मुंबईत लग्न संभारंभ, हॉटेल, पबमध्ये लोकांची गर्दी होत आहे. त्या ठिकाणी नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं महापालिकेला आढळून येत आहे. अशा व्यक्तींवर आता पालिकेनं कारवाई करण्यास सुरूवात केली असून, १४१०० लोकांना रविवारी दंड ठोठाविण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या या लोकांकडून २८ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल ठरवीक वेळेत सर्वांसाठी सुरू झली. मात्र, यामुळं रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये गर्दी वाढली. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी तोंडाला मास्क लावणं अनिवार्य आहे. तरीही अनेक ठिकाणी लोक मास्क लावत नसल्याचं दिसून येत आहे. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेनं फौज उभी केली आहे. तसंच मार्शल, शिक्षक, पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्या दररोज २५ हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य महापालिका प्रशासनानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, ४८ हजार मार्शल्स मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठ, रेल्वेस्थानक इथं लक्ष ठेवून आहेत. रविवारी जुहू चौपाटी इथं लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. अशीच गर्दी मुंबईतील अनेक भागांमध्ये दिसून आली.

यापैकी विनामास्क फिरणाऱ्या १४ हजार १०० लोकांवर रविवारी कारवाई करून २८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल २०२० ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १६ लाख दोन हजार ५३६ लोकांवर कारवाई करीत ३२ कोटी ४१ लाख १४ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा