Advertisement

कोरोनाचा कहर: राज्यात दिवसभरात 139 जणांच्या मृत्यूची नोंद, 2436 नवीन रुग्ण

राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 2436 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 42 हजार 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,

कोरोनाचा कहर:  राज्यात दिवसभरात 139 जणांच्या मृत्यूची नोंद, 2436 नवीन रुग्ण
SHARES

राज्यात आज 1475 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  2436 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 42 हजार 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 22  हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 45 हजार 947 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 375 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 291 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 139 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 75 पुरुष तर 64 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 139 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 78  रुग्ण आहेत तर 53 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 8 जण 40 वर्षांखालील आहे. या 139 रुग्णांपैकी 110 जणांमध्ये ( 79 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2849 झाली आहे. 

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 27 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 21 एप्रिल  ते 2 जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 65 मृत्यूंपैकी मुंबई 41, जळगाव 13, ठाणे 30, कल्याण डोंबिवली 7, मालेगाव 8, रत्नागिरी 5, पुणे 3, भिवंडी 1, सोलापूर 2, नाशिक 2 अशी मृत्यूची नोंद आहे.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 333 रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील 140 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3479 झोन क्रियाशील असून आज एकूण 18 हजार 026 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 69.18  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा