
मुंबईतील Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 मार्च रोजी बांद्रा, खार आणि सांताक्रूझ (H-West Ward) परिसरातील अनेक भागांमध्ये सुमारे 16 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
BMC नव्या पाईपलाईनचे काम करत असल्यामुळे हा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. काही ठिकाणी पाणी पूर्णपणे बंद राहील, तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
BMC च्या माहितीनुसार, बांद्रा पश्चिम येथील रामदास नाईक मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्शनदरम्यान 750 मिमी व्यासाच्या नव्या जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 28 मार्च रोजी रात्री 11 वाजल्यापासून 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत (सुमारे 16 तास) चालणार आहे. त्यामुळे या काळात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
BMC नुसार, शनिवार 28 मार्च रोजी खार पश्चिम, डॉ. आंबेडकर मार्ग परिसर, पाली व्हिलेज, पाली पठार तसेच बांद्रा पश्चिममधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होईल.
रविवार 29 मार्च रोजी बांद्रा पश्चिममधील मार्केट रोड, जैन मंदिर रोड, डी’मॉन्टे रोड, हिल रोड, पेरी रोड, मॅन्युअल गोंसाल्वेस रोड, सेंट अँड्र्यूज रोड, सेंट पॉल्स रोड, डॉमिनिक रोड, आर. के. पाटकर रोड, न्यू आणि ओल्ड कांटवाडी, रणवार व्हिलेज, वरोडा रोड, कार्टर रोड, पाली हिल रोड, चिंबई व्हिलेज, शर्ली व्हिलेज, राजगाव, मालगाव आणि पालीगाव या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील.
याशिवाय खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण आणि गजधरबांध झोपडपट्टीच्या काही भागांनाही पाण्याची समस्या भेडसावणार आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना आधीच पुरेसा पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील 4 ते 5 दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
हेही वाचा
