येत्या मंगळवारी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी पश्चिम उपनगरातील अनेक भागातल्या नळांना पाणी येणार नाही. त्यामुळे रहिवाशांना आदल्या दिवशीच पाण्याची बचत करावी लागणार आहे.
25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील अनेक भागात पालिका 100 टक्के पाणी कपात करणार आहे. यामुळे जुहू, अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रुझ, वांद्रे, खार, गोरेगाव, विलेपार्ले, राम मंदिर रोड आणि बिंबीसार आणि एच-पूर्व वार्डातील-सांताक्रूझ, प्रभात कॉलोनी, आशा नगर, जकू क्लब, सेवा नगर आणि हनुमान टेकदी या परिसरात पालिकेच्या नळाला पाणी येणार नाही.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पवई ते वेरावली पाइपलाइन भांडुप-मरोशीच्या मुख्य पुरवठा केंद्राला जोडण्याचं काम पालिकेकडून केलं जाणार असल्यानं पश्चिम उपनगरातील काही भागांत पाणी कपात केलं जाणार आहे.