Advertisement

मीरा भाईंदरमध्ये 'बांग्लादेश', स्थानिक संतप्त

पालिकेने बस थांब्यालाच बांग्लादेश असं नाव दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मीरा भाईंदरमध्ये 'बांग्लादेश', स्थानिक संतप्त
SHARES

मुंबईलगत असलेल्या भाईंदर (Bhayandar) शहरातील एका बस स्टॉपचे नाव 'बांगलादेश' (Bangladesh) ठेवण्यात आले आहे. बसस्टॉपचे नाव बदलण्यात आल्याने मोठा गदारोळ माजला आहे.

भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उत्तन चौकातील परिसरात असलेल्या बस स्टॉपला हे नाव देण्यात आले आहे. 

उत्तन नगरमधील एका परिसराला बांग्लादेश हे उपनाम देण्यात आले आहे. कारण या परिसरात बांग्लादेशातून आलेले निर्वासित नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळं अनेकजण हा भागाला बांग्लादेश असं म्हणतात.

मात्र, पालिकेने बस थांब्यालाच बांग्लादेश असं नाव दिल्याने मोठी खळबळ माजली आहे. पालिकेने हे नाव दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी नोंदवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसराचे मूळ नाव इंदिरा नगर आहे. भाईंदर पश्चिममध्ये समुद्र किनारा आहे. त्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात माच्छिमार बांधव राहतात. इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. सुरुवातीला इथे मासे पकडण्यासाठी कामगारांची गरज भसत होती. त्यावेळी पश्चिम बंगालमधून अनेक जण कामाच्या शोधात इथे आले होते. कालांतराने ते तिथेच स्थायिक झाले. 

भाईंदरच्या पालीचौकात ही मूळ वस्ती आहे. मात्र तिथे राहत असलेल्या कामगारांची भाषा बांग्ला होती. त्यामुळं या वस्तीला बांग्लादेश वस्ती म्हणूनही ओळखलं जाऊ लागले. पुढे भाईंदरमध्येही याच नावाने ही वस्ती ओळखली जाऊ लागली. 

इतकंच नव्हे तर, या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्ड, लाइट बिल आणि नगरपालिकेच्या घरांवरही बांगलादेश हेच नाव लिहण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे मीरा- भाईंदर महापालिकेला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा