Advertisement

देवनार कत्तलखाना जुलैपासून होणार सुरू


देवनार कत्तलखाना जुलैपासून होणार सुरू
SHARES

मागील ३ महिन्यांपासून बंद असलेले देवनारमधील पालिकेचे पशुवधगृह प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा सुरू होणार आहे. लॉकडाऊनमुळं पुणे, नागपूर, मुंबई येथील मोठे पशुवधगृह बंदच असल्यामुळे मटणविक्रीवर परिणाम झाला होता. मात्र आता हे सुरु होणार असल्यामुळं बाजारात वाढलेले मटणाचे भाव त्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

पावसाळा आल्यानं माशांची आवकही कमी आहे. त्यामुळे कत्तलखाने सुरू करावे, अशी मागणी ‘ऑल इंडिया जमियातुल कुरेशी’ या मांसविक्रेत्यांच्या संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर आता पालिकेने जुलैपासून कत्तलखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देवनार कत्तलखान्यात साधारण १००० लोक असतात. दर मंगळवारी-शुक्रवारी प्राण्यांचा बाजार भरतो. गर्दी टाळण्यासाठी नव्या नियमावलीनुसार काम केले जाणार आहे. तसेच प्राण्यांचा बाजार भरणार नाही. कमीत कमी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. दर गुरुवारी कत्तलखाना बंद ठेवण्यात येणार आहे.

देवनार पशुवधगृहात ३००० बकऱ्यांचा, ३०० डुक्कर आणि ३०० म्हशींची कत्तल केला जात होती. मात्र प्रायोगिक तत्त्वावर वधगृह सुरू केल्यानंतर दर दिवशी १५० म्हशी, १५० डुक्कर, तर सुमारे दीड हजार बकऱ्यांचीच कत्तल केली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांचीच गरज भागेल एवढेच हे प्रमाण असेल.

ही आहे नियमावली

  • म्हैस/ रेडे, बकरे, शेळ्या, मेंढ्या, वराह (डुक्कर) यांची कत्तल करता येणार.
  • कर्मचारी आणि वधासाठी येणारे व्यावसायिक यांना सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, हॅन्डग्लोव्हज घालणे बंधनकारक.
  • जनावरांचा बाजार भरविण्यास मनाई.
  • जनावरांची कत्तल केल्यानंतर चरबी, यकृत, चामडे यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी परवानाधारकांचीच राहणार आहे.
  • धार्मिक कार्यासाठी बकरे कत्तल करण्यास मनाई.
  • २ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सात दिवसांसाठीचा परवाना मिळणार .
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा