Advertisement

मुंबईत १२५७ नवे रुग्ण, ५० जणांचा दिवसभरात मृत्यू ५०

शनिवारी दिवसभरात ८९८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण २ लाख १९ हजार १५२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत १२५७ नवे रुग्ण, ५० जणांचा दिवसभरात मृत्यू ५०
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, राज्यात शनिवारी कोरोनाने १३७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत शनिवारी दिवसभरात १२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-Navratra Utsav 2020 : मुंबादेवी! मुंबईची ग्रामदैवत

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत शनिवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५० रुग्ण दगावले आहेत. तर २१ आँक्टोंबर रोजी २१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २४ आँक्टोंबर रोजी एकूण ४५ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे १२५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख ५० हजार ६१ इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात ८९८ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण २ लाख १९ हजार १५२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-Navratri 2020: नवरात्रोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची संख्या कमी

सध्या महाराष्ट्रात या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध असून तुटवडा होणार नाही, याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवलं जात असल्याचंही मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविलं आहे. या औषधाच्या विक्री, वितरण व साठ्यावर आणि काळ्या बाजारावर अन्न व औषध प्रशासन विभाग नियंत्रण ठेवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून त्यावर प्रशासनातर्फे नियंत्रण ठेवलं जात आहे. सदर औषधाचं वितरण फक्त रूग्णालय व संस्था यांनाच करण्यासाठी अनुमती दिलेली आहे.

हेही वाचा -कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश

आजतागायत प्रशासनामार्फत यापूर्वी काही प्रकरणी जप्ती व छाप्यांची कारवाई केली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपींना पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे. प्रशासनामार्फत अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात २४X७ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा क्रमांक ०२२-२६५९२३६४ आहे तसेच टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ हा उपलब्ध आहे. तरी रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्याही रुग्णास मिळत नसल्यास अथवा औषधाचा काळाबाजार होत असल्यास त्या बाबतची माहिती त्यांनी संबंधित अन्न व औषध प्रशासन जिल्हा कार्यालयास अथवा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास औषध मिळूवन देण्यास निश्चित मदत केली जाईल तसेच काळाबाजार होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही सह आयुक्त मंत्री यांनी पत्रकाद्वारे कळविलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा