डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने (CR) 12 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसटी) दरम्यान तब्बल 4 स्पेशल धावतील, 1 स्पेशल कलबुर्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) दरम्यान धावेल.
विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
(अ) नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष (4)
1. विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूरहून 4.12.2024 रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.
2. विशेष गाडी क्रमांक 01264 ही 5.12.2024 रोजी सकाळी 08.00 वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
3. विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूरहून 5.12.2024 रोजी दुपारी 03.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी 10.55 वाजता पोहोचेल.
कुठे थांबणार? : अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.
रचना: विशेष ट्रेन क्रमांक 01262, 01264 आणि 01266: 16 सामान्य द्वितीय श्रेणी.
4. विशेष गाडी क्रमांक 02040 नागपूर येथून 7.12.2024 रोजी दुपारी 01.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
कुठे थांबणार : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर
रचना: विशेष ट्रेन क्रमांक 02040: 16 सामान्य द्वितीय श्रेणी
(क) कलबुर्गी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष (1)
1.विशेष गाडी क्रमांक 01245 कलबुर्गी येथून 5.12.2024 रोजी संध्याकाळी 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
कुठे थांबणार : गंगापूर रोड, अक्कलकोट, सोलापूर, कुरुडूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.
रचना: 22 सामान्य द्वितीय श्रेणी.
सर्व भक्तांना/अनुयायांना विनंती आहे की, कोणत्याही खोट्या बातम्या/अफवांवर विश्वास ठेवू नये.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या/जाणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत.
हेही वाचा