Advertisement

घर आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरलेल्यांना 'इतकी' मदत मिळणार

संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल

घर आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरलेल्यांना 'इतकी' मदत मिळणार
SHARES

पावसाळ्यात येणाऱ्या पुराचा फटका अनेकांना बसतो. अनेकांच्या घरात पाणी शिरते. अशा नागरिकांना आर्थिक मदत सरकार तर्फे केली जाते. 

पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे.

पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषेदतही केली.

राज्य आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय नसली तरी, अधिकृत दुकाने आणि टपरीधारकांनाही नुकसानीपोटी मगील वर्षाप्रमाणे मदत दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

सोमवारी विधान परिषदेला माहिती देताना पवार म्हणाले की, पूरग्रस्त ग्रामस्थांना 10,000 रुपयांव्यतिरिक्त, दुकानातील मालकांना, 50,000 रुपये दिले जातील आणि पूरमुळे मरण पावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना खूप मुसळधार पाऊस पडला, अशी माहिती पवारांनी सभागृहात दिली. त्यामध्ये यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिमचा समावेश आहे.

एनडीआरएफने यवतमाळमधील 110 लोकांची सुटका केली. लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. 

तसेच २५ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टी व पूरस्थितीकाळात नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला दिलेल्या सूचना


धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.


पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.


शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत.


ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत.


बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.


ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी.


रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.


ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा