Advertisement

आनंदवार्ता! मुंबईला मिळणार वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा


आनंदवार्ता! मुंबईला मिळणार वर्षभर विनाकपात पाणीपुरवठा
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची वर्षभराची विनाकपात तहान भागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मुसळधार पावसामुळं भातसा धरण भरून वाहू लागलं असून, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू लागेल, अशा स्थितीत आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. रविवारी सातही धरणात ९७ टक्के म्हणजे सुमारे १४ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाण्याचा साठा सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती समोर येत आहे.

मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदाच्या जून महिन्यात पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईवर पाणीकपातीचे संकट आले होते. मात्र, त्यानंतर जुलैमधील पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस बरसल्याने तलावांमधील पाण्याचा कोटा भरून निघाला. ऑगस्टअखेरीस तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यानं तलावात अपेक्षित पाणीसाठा जमा झाला आहे.

जुलै आणि ऑगस्टमध्ये तुळशी, विहार, तानसा आणि मोडकसागर तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर शनिवारी ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील भातसा धरणही ओसंडून वाहू लागले आहे. भातसा हे राज्य सरकारच्या मालकीचे धरण असून, या धरणातून मुंबईला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी साठवण क्षमता सर्वाधिक म्हणजे ७ लाख दशलक्ष लिटरहून अधिक आहे. सध्या या धरणात ७ लाख ११ हजार २४ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे. मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव सुमारे ९८ ते ९९ टक्के भरले आहेत.

३ वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • २०२१ : १३,९८,६०८
  • २०२० : १४,२०,४५६
  • २०१९ : १४,१३,२४७

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

  • अप्पर वैतरणा - २०३२९३
  • मोडकसागर - १२८९२५
  • तानसा - १४३७१०
  • मध्य वैतरणा - १८५८११
  • भातसा - ७०११२४
  • विहार - २७६९८
  • तुळशी - ८०४६
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा