Advertisement

रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण


 रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदूषण
SHARES

कांदिवली - दत्ताजी पार्क येथे जिन्स कलर प्रोसेसिंग फॅक्टरीमधून रसायनयुक्त पाणी गटारात सोडण्यात येत आहे. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे.
संबंधित व्यावसायिकाकडून हे पाणी कुठलीही शुद्धिकरण प्रक्रिया न करता गटारात सोडण्यात येत आहे. या संदर्भात "स्थानिक नागरिकांनी व्यावसायिकाला बऱ्याचदा समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले", असे बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या एका राहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, पालिकेचे सहायक अभियंता सुनील व्हटकर यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले की " आमचे न्यूसेन्स डिटेक्टिव्ह जागेवर जाऊन खात्री करतील आणि तथ्य आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल".

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा