रस्त्यावर राहणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ (firte pathak) ही योजना राज्यात नियमित स्वरूपात राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे राज्यभरात (maharashtra) रस्त्यावर राहणाऱ्या हजारो बालकांना शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि नवजीवनाची संधी मिळणार असून, ही योजना बालहक्कांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी एक व मुंबई महानगरपालिका (bmc) पूर्व व पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी एकूण 31 फिरती पथके सुरू करण्यात येणार आहेत. आगामी काळात याची व्याप्ती राज्यात वाढविण्यात येणार आहे.
रस्त्यावर राहणाऱ्या, एकल, अनाथ व दुर्लक्षित बालकांना (orphans childrens) समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना शिक्षणाची गोडी लावणे, वैद्यकीय सेवा पुरवणे आणि त्यांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.
सुरुवातीला मिशन वात्सल्य अंतर्गत मुंबई शहर (mumbai), मुंबई उपनगर, ठाणे (thane), पुणे, नागपूर, नाशिक अशा सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती. याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.
या योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेषतः बाल स्नेही बस, व्हॅनद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. या व्हॅनमध्ये समुपदेशक, शिक्षक, महिला कर्मचारी, वाहनचालक व काळजीवाहक असे चार जणांचे पथक असेल. मुलांचे सामाजिक अन्वेषण अहवाल तयार करून त्याआधारे त्यांच्या गरजांनुसार वैयक्तिक पुनर्वसन आराखडा तयार केला जाईल.
मुलांना वयाप्रमाणे अंगणवाडीत, शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करून लसीकरण, पोषण आहार, औषधोपचार, स्वच्छतेच्या सवयी आणि व्यसनमुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांना विविध कला व शिक्षणावरील उपक्रमांतही गुंतवले जाणार आहे.
हेही वाचा