सायन- जीटीबीनगर येथील ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या विभागातील गुरुद्वारा, मंदिर, भाजी मार्केट अशा ठिकाणी लोकांची गर्दी होते. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅमही होते.
या परिसरात गॅरेज तसेच दुकाने असल्याने येथे पार्किंगही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दुपारच्य वेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. भाजपचे आमदार 'सरदार तारा सिंग' यांचे कार्यालय ही याच रस्त्यालगत असल्याने त्यांनाही या ट्रॅफिक चा त्रास होतो व त्यासाठी त्यांनी वरळी आरटीओकडे तीन वेळा तक्रार नोंदवली आहे. 'नो पार्किंगचा बोर्ड लावूनही हीच समस्या आहे', असे आमदार 'तारा सिंग' या सांगिलते.