Advertisement

कोकणातील शेतकऱ्यांचे 'चलो मुंबई' आंदोलन

शेतकरी संघटनांनी असा आरोप केला आहे की सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई अपुरी पडत आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचे 'चलो मुंबई' आंदोलन
SHARES

कोकण विभागातील शेतकरी प्रतिकूल हवामानामुळे आंबा आणि काजू उत्पादकांचे झालेल्या नुकसानीपोटी अधिक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी 15 मे रोजी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 'चलो मुंबई' (chalo mumbai) हा भव्य मोर्चा काढणार आहेत.

शेतकरी संघटनांच्या मते बदलत्या हवामानाच्या स्वरूपामुळे या वर्षी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये आंबा व काजू पिकाला मोठा फटका बसला आहे.

त्यामुळे येथील शेतकऱ्यांना (farmers) प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. आंदोलक आंबा बागांसाठी प्रति हेक्टर 5 लाख रुपये आणि काजू बागांसाठी प्रति हेक्टर 3 लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.

सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई अपुरी असल्याने बागायतदारांना प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीचे त्यात योग्य प्रतिबिंब उमटत नाही, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

यापूर्वी, शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यातील नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन (protest) केले होते. तसेच आपल्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

आगामी मोर्चा मुंबईतील (mumbai) गिरगाव चौपाटी येथून सुरू होईल आणि मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानाच्या दिशेने मार्गस्थ होईल.

आंबा काजू उत्पादकांसाठी तातडीची आर्थिक मदत आणि दीर्घकालीन आधारभूत उपाययोजनांच्या मागणीसाठी या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले.



हेही वाचा

घोडबंदर रोडवर ब्रिजच्या कामामुळे ट्रॅफिक निर्बंध लागू

मुंबईच्या चौपाटी आणि जुहू बीचवर डांबराचे गोळे आढळले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा