मुंबईकरांना येत्या १६ मे ला शून्य सावलीचा दिवस अनुभवायला मिळणार आहे. कारण या दिवशी सूर्य क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. या दिवशी सूर्य पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात कधीच डोक्यावर येत नाही. पण, दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. त्या दिवशी दुपारी सूर्य आपल्या डोक्यावर येतो, आपली सावली आपल्या पायाखाली आल्याने सावली अदृश्य होते. या दिवसाला ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ असं म्हणतात, असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात. असाच शून्य सावलीचा दिवस तुम्हाला येत्या १६ मे ला मुंबईत अनुभवता येणार आहे.
१७ मे रोजी ठाणे, डोंबिवली, कल्याणमधून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभं रहावं. पण, या दिवशी तुम्हाला आपली सावली पायाखाली आल्याने दिसणार नाही, असंही दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.
या ठिकाणांवरून त्या त्या दिवशी तुम्हाला शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.