Advertisement

गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद, आले मोठे कारण समोर

पुढचे काही दिवस गेटवे ऑफ इंडिया बंद ठेवण्यात येणार आहे.

गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद, आले मोठे कारण समोर
SHARES

पुढचे काही दिवस गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सहा दिवसांपूर्वी संशयास्पद बोटीत शस्त्र सापडली होती. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत गेटवे ऑफ इंडिया बंद राहिल.

मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आजपासून सहा दिवसांपूर्वी माय लेडी हान नावाची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीची तपासणी केली असता त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

दरम्यान हरिहरेश्वर समुद्रकिनारी सापडलेल्या संशयास्पद बोट प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने आर्म्स अॅक्ट अंतर्गत अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र एटीएस या प्रकरणी संबंधित कंपनीशी बातचीत करुन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एटीएसने आतापर्यंत कोणतीही थिअरी फेटाळलेली नाही.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर मागील आठवड्यात गुरुवारी (18 ऑगस्ट) सकाळी 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे आहे. या बोटीतून तीन 'अ‍ॅसॉल्ट रायफल', स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.



हेही वाचा

बेस्ट तर्फे आता दिव्यांग प्रवाशांना स्मार्ट कार्ड घरपोच मिळणार

मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा