माथाडी कामगारांनी (Mathadi Kamgar Strike News) आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे नवी मुंबईतील पाचही मार्केट बंद आहेत. पहाटे सुरू होणाऱ्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्येही कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.
माथाडी कामगारांच्या संपामुळे भाजीपाला (Vegetables) तसेच कडधान्याचा आज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता (Possibility of Shortage) आहे. त्याचसोबत भाजीपाला आणि कडधान्य आज महागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी करण्यात काम बंद आंदोलन (Work Strike Movement) करण्यात आले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील (Mathadi Leader Narendra Patil) यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन (Mathadi Workers Agitation) करण्यात आले आहे.
माथाडी कामगारांच्या शासनाच्या विविध विभागाअंतर्गत असलेल्या न्याय प्रश्नांची सोडवण्यासाठी तातडीने लक्ष दिले जावे, अन्यथा माथाडी कामगारांना तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा घेणे भाग पडेल, असा इशाराही माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. संप, आंदोलने, बैठका झाल्या परंतु माथाडी कामगरांचे प्रश्न तसेच आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांनी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे माथाडी कामगारांच्या मागण्या?
हेही वाचा