आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेची मुंबईतील लोकल सेवा सध्या १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.
वैतरणा-विरार दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.