मंगळवारी मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी सहा तास बंद राहणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत ही सेवा बंद राहणार आहे. त्यामुळं विमानांच्या उड्डाणांना उशीर होणार आहे.
मुंबई विमानतळावरून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत एकही विमान उड्डाण किंवा उतरणार नाही. या काळात दररोज होणाऱ्या तब्बल तीनशे विमानांच्या उड्डाणांना उशीर होईल. एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना धावपट्टी बंद राहण्याच्या कालावधीत अधिक माहितीसाठी एअर इंडियाची वेबसाईट, अॅप किंवा कॉल सेंटरला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.