Advertisement

रेल्वे रुळांशेजारी भाजी पिकवता येणार नाही

रेल्वे रुळांशेजारील जमिनींवर सांडपाण्यातून भाजी पिकवून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

रेल्वे रुळांशेजारी भाजी पिकवता येणार नाही
SHARES

रेल्वे प्रवासावेळी अनेकदा रुळांच्या शेजारी भाजीपाल्याची शेती केलेली पाहायला मिळते. अनेकजण भाज्यांची शेती करून ती विक्रीसाठी बाजारात आणतात. परंतू, या भाजीपाल्यांवरून यापूर्वी वाद झाले आहेत. शिवाय, सांडपाण्यातून भाजी पिकवल्याचा प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळं रेल्वे रुळांशेजारील जमिनींवर सांडपाण्यातून भाजी पिकवून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनानं अशा जमिनींवर फुलांची शेती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

फुलांची शेती करू इच्छिणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत आणि मार्गदर्शन ही करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण-कसारा-कर्जत मार्ग असो वा हार्बर आणि ट्रान्स हार्बर सर्वच रेल्वे रुळांच्या शेजारी रेल्वे जमिनींवर तसंच, महापालिका जमिनींवर मोठ्या प्रमाणात भाजीचे मळे पिकवले जातात.

सांडपाणी मिश्रित आणि अस्वच्छ पाण्यावर या भाज्या पिकवल्या जातात. रेल्वेविषयक कामांचा आढावा आणि प्रवाशांच्या समस्या मांडण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनीही रेल्वे जमिनींवर फुलांची शेती करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाला दिला.

'ग्रो मोअर फूड' योजनेंतर्गत फुलांची शेती करण्याचा पर्याय रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. फुलांची शेती कशी करावी, त्याची निगा कशी राखावी, त्याची विक्री कुठे करावी, याबाबत माहिती दिली जाणार आहे. रुळांशेजारील रेल्वे हद्दीतील जमिनींवरच ही योजना लागू असेल. मध्य रेल्वेवरील विविध तुकड्यात विभागलेल्या सुमारे १०० एकरपेक्षा जास्त जमिनी रुळांच्या शेजारी आहे.



हेही वाचा -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा