अजिज बाग - चेंबूर येथील तलावात साचलेला कचरा आणि निर्माल्य साफ करण्यात आलंय. हा तलाव आरसीएफ कंपनीच्या हद्दीत येतो. देवी विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य आणि कचरा मोठ्या प्रमाणात तलावात साचला होता. कचऱ्यामुळे तलावातल्या जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला होता. आरसीएफ कंपनी या तलावातल्या पाण्याचा वापर करते आणि त्याची देखभालही. त्यामुळे ही बाब आरसीएफ कंपनीच्या लक्षात आल्यानंतर लगेचच तलावाच्या पाण्यातील निर्माल्य साफ करण्यात आलं.