बिरहानमुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पण शासन निर्णय येईपर्यंत दुपारच्या सत्राच्या शाळा भरल्या होत्या. त्यामुळे आता आलेल्या या निर्णयानंतर शाळेतील मुलांना बहुदा लवकर सोडण्यात आले.
प्रत्येक शिक्षकाने इमारत सोडण्यापूर्वी संबंधित प्रतिनिधींना माहिती द्यावी आणि शाळा स्तरावर समन्वयासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय रायगड, पुणे, पालघर, ठाणे, पिंपरी यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व बस आणि गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी 10.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. 10.55 वाजता सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. बीएमसीने सर्वांना सहकार्य करण्यास सांगितले आणि आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहनही केले आहे.
हेही वाचा