महाराष्ट्र (maharashtra) राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi niradhar yojana) अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या आर्थिक मदतीत (Financial help) 1,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
पूर्वी या लाभार्थ्यांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. आता ती 2,500 रुपये दिली जाईल. राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत, निराधार पुरुष, महिला, अनाथ, सर्व श्रेणीतील दिव्यांग, निराधार विधवा इत्यादींना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 4 लाख 50 हजार 700 लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत 24 हजार 3 दिव्यांग लाभार्थी आहेत.
आता या लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून दिले जाईल. यासाठी 570 कोटी रुपयांची आवश्यक तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
हेही वाचा