Advertisement

१७ हजार पदांसाठी मुंबई, ठाण्यात ऑनलाइन रोजगार मेळावा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील १७ हजार जागांची भरती करण्यात येणार आहे.

१७ हजार पदांसाठी मुंबई, ठाण्यात ऑनलाइन रोजगार मेळावा
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए)  विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील १७ हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी  कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचं आयोजन मुंबई आणि ठाण्यामध्ये करण्यात आलं आहे. 


ठाण जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने ६ ते ८ जुलै या कालावधीत तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी ८ ते १२ जुलै या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे.


एमएमआरडीएअंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे गवंडी, सुतार, फिटर (स्टील फिक्सींग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्सिंग करणारे), वेल्डर, इलेक्ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार अशा तब्बल १७ हजार
मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यापैकी ऑनलाइन मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदे भरली जाणार आहेत.  रिक्तपदे विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही रिक्तपदे मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत.

ज्या उमेदवारांनी  https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील एम्प्लॉयमेंट जॉब सिकर यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरून नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करण आवश्यक आहे. तसंच ज्यांनी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर रजिस्टरवर क्लिक करून सर्व माहिती भरून नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत मोबाइल क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळेल.

वेबपोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असं आवाहन विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा