Advertisement

मुंबईतल्या धरणांमध्ये केवळ 2 महिने पुरेल इतका पाणीसाठा

धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून तो 32.32 टक्क्यांपर्यंत खाली उतरलाय.

मुंबईतल्या धरणांमध्ये केवळ 2 महिने पुरेल इतका पाणीसाठा
SHARES

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त दोन महिने पूरेल एवढंच पाणीसाठी उपलब्ध आहे. या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून तो 32.32 टक्क्यांपर्यंत खाली उतरलाय.

गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी नीचांक असून मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट ओढवू शकतं. धरण परिसरात पाऊस होण्यापर्यंत म्हणजे पुढील चार महिने मुंबईकरांना पाणी साठा पुरवण्याच खडतर आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. (mumbai news Water crisis in Mumbai The stock in the 7 dams is only enough for two months)

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात 32 टक्के म्हणजे 4 लाख 67 हजार 766 दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी हे मुंबईकरांना तीन दिवस चालतं. पण उन्हाळा सुरु झाल्यानंतर मुंबई पालिकेचे नियोदजनाचे गणित फुसकटणार. 

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई पालिकेने राज्य सरकारला राखील साठ्यातून पाणी मिळवण्यासाठी पत्र लिहिलं होतं. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा पाणीसाठी 42 टक्के होता. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी हे मुंबईकरांना गरज पडल्यास वापरलं जाईल असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

धरणातील पाणीसाठी

वर्ष
पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
टक्केवारी
25 मार्च 24
4,67,766
31.32%
25 मार्च 23
5,63,181
38.91%
25 मार्च 22
6,06,741
41.92 %


कांजुरमार्ग स्टेशनवर पावडर रूम, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा