कोरोनामुळं यंदाच्या वर्षातील सर्व सामने रद्द करावे लागले. टी-२० वर्ल्ड कपपासून ते अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द कराव्या लागल्या. पण, इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यापाठोपाठ इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) झाली. अशातच आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्यासाठी सिडनीत दाखल झाली आहे. त्यामुळं क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातवरण निर्माण झालं आहे.
टीम इंडिया पुढील १२ महिने नॉन स्टॉप क्रिकेट खेळणार आहे. भारतीय संघ जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत १४ कसोटी, १६ वन डे व २३ टी-२० सामने खेळणार आहेत. त्याव्यतिरिक्त आशिया चषक टी-२० ( जून), आयसीसी वर्ल्ड कप (ऑक्टोबर) आणि आयपीएल २०२१ हे आहेच. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून जानेवारी मायदेशात परतल्यानंतर टीम इंडिया २ महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार घेणार आहे.
नॉन स्टॉप खेळणार क्रिकेट
झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे भारतीय संघ तीन वन-डे सामने खेळणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं बुधवारी त्याची अधिकृत घोषणा केली.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा