Advertisement

IPLचे सामने वानखेडे मैदानावर होणार का? जाणून घ्या!

जगातली सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलवरही कोरोनाचे परिणाम जाणवू लागले आहेत.

IPLचे सामने वानखेडे मैदानावर होणार का? जाणून घ्या!
SHARES

वाढत्या कोरोनामुळं महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. जगातली सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. आयपीएलची तयारी करत असलेल्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच मुंबईच्या वानखेडे (Wankhede Stadium) मैदानातील ८ कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल सामने मुंबईबाहेर असल्याची चर्चा सुरु होती. मात्र या चर्चांना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav ganguly) पूर्णविराम दिला आहे.

मुंबईतील नियोजित सामने वानखेडे मैदानावरच पार पडतील, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट करत नाहक चर्चेतील हवा काढून घेतली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंवर कोणताही परिणाम होत नाही. अशा वातावरणात खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळं मुंबईत सामने खेळविण्यास तूर्तास तरी कोणताही धोका नाही, असं सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मुंबईत सामने खेळविण्यास परवानगी मिळाली आहे. १० ते २५ एप्रिलदरम्यान मुंबईत केवळ १० सामने पार पडणार आहे. आमच्याकडे खूपच सुरक्षित सेट आहे जिथे खेळाडू आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहे, तिथे त्यांना कसलाही धोका नाही, असं गांगुली यानं स्पष्ट केलं.

एकूण ४ संघ आपला सुरुवातीचा सामना मुंबईत खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे सलामीचे सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडणार आहेत.

कोरोना चाचणी दररोज 

  • बीसीसीआय खेळाडूंची कोरोना चाचणी रोज करु शकते.
  • सध्या दर ३ दिवसांनी कोरोना चाचणी घेतली जाते.
  • सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी बीसीसीआय दररोज चाचण्या घेऊ शकते.

ग्राऊंड स्टाफसाठी स्वतंत्र बायो बबल

  • बीसीसीआयचं कार्यकारी पथक आधीच बायो बबलचा एक भाग आहे. 
  • ग्राऊंड स्टाफसाठी स्वतंत्र बायो बबल तयार केलं जाईल.

विमानतळाची सुरक्षा

  • कोणत्याही टीमला पहिल्या एका महिन्यात प्रवास करावा लागणार नाही. 
  • प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी बीसीसीआयला घ्यावी लागेल.
  • विमानतळावरही विशेष लक्ष द्यावे लागेल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा