सायबर पोलिसांनी आतापर्यंत अफवा पसरवणाऱ्या 241 जणांवर गुन्हा दाखल


सायबर पोलिसांनी आतापर्यंत अफवा पसरवणाऱ्या 241 जणांवर गुन्हा दाखल
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नवनवीन अफवा सोशल मिडियावर पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी आता कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहेत. व्हॉटस अँप, फेसबुक किंवा अन्य सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर आतापर्यंत पोलिसांनी  गुन्हे दाखल केले आहेत.


महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी विविध जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात आता गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र सायबर विभाग लॉकडाऊनच्या काळात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये 241 गुन्हे 19 एप्रिल 2020 पर्यंत दाखल झाले आहेत . यातील आठ गुन्हे अदखलपात्र आहेत. या  गुन्ह्यांमधे आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 110 गुन्हे दाखल झाले आहेत.आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 81 गुन्हे तर  titktok विडिओ शेअर प्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे व अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 41 गुन्हे दाखल झाले आहेत.  त्यामध्ये आतापर्यंत 47 आरोपींना अटक केली आहे .

कुठल्या जिल्ह्यात किती गुन्हे दाखल

 बीड 27, पुणे ग्रामीण 19, मुंबई 17, कोल्हापूर 16, जळगाव 14, सांगली 10, नाशिक ग्रामीण 10, जालना 9, सातारा8, नाशिक शहर 8,नांदेड 7,परभणी 7 , ठाणे शहर 6, सिंधुदुर्ग 6 , नागपूर शहर 5, नवी मुंबई 5,सोलापूर ग्रामीण 5, लातूर 5, बुलढाणा 5, पुणे शहर 4,, गोंदिया 4, ठाणे ग्रामीण 4, सोलापूर शहर 3, रायगड 2, हिंगोली 2, वाशिम 1 ,धुळे 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये ग्रुपमधील उपद्रवींकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना ग्रुप अँडमिनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच बैजल यांनी व्हाँट्स अँप ग्रुप अँडमिना सध्याच्या पार्श्वभूमिवर त्याच्या ग्रुपमधील सेटींगमध्ये जाऊन ज्या ग्रुपला ते  अँडमिन आहेत. त्या ग्रुपवर फक्त तेच मेसेज टाकू शकतील अशी सेटींग करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  सतर्कता बाळगावी

सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे . कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन  ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स,क्रेडिट/ डेबिट कार्ड ची सर्व माहिती विचारली जाते .त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा  otp कन्फर्म (confirm) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो . 

सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी ,तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी .

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा