आपत्कालीन स्थितीचा सामना कसा करावा? यासाठी जिल्हावार शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 'स्कूल सेफ्टी प्रोग्राम' तयार केला खरा, पण हा प्रोग्राम २०१६ पासून लालफितीत अडकल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'ला मिळाली आहे.
सुमारे ७ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या प्रोग्रामच्या टेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झालेली आहे. तरीही या प्रोग्रामची फाईल एक इंचही पुढे सरकलेली नाही. हा प्रकल्प अनेक कारणांमुळे लालफितीत अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी चालू वर्षाच्या अखेरपर्यंत हा प्रोग्राम सुरू होईल, असे सांगितले.
आपत्तीचा सामना करता यावा यासाठी १,१०० शाळेतील विद्यार्थ्यांना सुरूवातीला प्रशिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हे विद्यार्थी आपल्या पालकांनाही हे प्रशिक्षण देऊ शकतील. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
हेही वाचा -
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल द्या- राज्यमंत्री
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा- विद्यार्थी संघटना
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)