Advertisement

बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअरींग (अभियांत्रिकी) च्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार
SHARES

आता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअरींग (अभियांत्रिकी) च्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय गाभा समजले जातात. मात्र, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण परिषदेने या नियमांमध्ये बदल केले आहेत. तंत्रशिक्षण परिषदेने १४ विषयांची यादी जाहीर केली आहे. कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

यंदाच्या वर्षापासून अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा अंतर्भाव असेल.

दरम्यान, या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून विरोध होत आहे. गणित हा विषय अभियांत्रिकीच्या सर्व विषयांचा पाया आहे. प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी काळात हा विषय चर्चेचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा