कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू, आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवार १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
ऑमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अखेर शाळा सुरु होण्याबाबतची महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
ऑमिक्रॉनमुळं पालकांचा पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार आहे. शाळा नवीन वर्षात सुरु करण्यात याव्यात, अशी त्यांनी मागणी केली होती. शाळांकडून सूचना न मिळाल्याने पालक संभ्रमात होते. मात्र यावर आता महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी याबाबत स्पष्ट केलं आहे.
मुंबईत बुधवारपासून १ली ते ७वीच्या शाळा सुरू होणार आहेत. याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बुधवारपासून म्हणजे १५ डिसेंबरपासून १ली ते ७वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापकांना मुंबई महापालिकेनं तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळं पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यात ऑमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. तर, पालकांच्या मनातही ऑमिक्रॉनविषयी भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून पाऊलं उचलली जात आहेत. १ डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पण शहरातील शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
आता शहरातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय महापालिकेनं ३० नोव्हेंबर रोजीच घेतला होता. १५ डिसेंबरपासून १ली ते ७वीचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत.
त्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावली देखील जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरू होण्यास एक दिवस बाकी असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात न आल्यानं पालकवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. पण शाळा सुरू करण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आला नसून १५ डिसेंबरपासूनच शाळा सुरू होतील असं तडवी यांनी सांगितलं आहे.
औरंगाबाद शहरातील देखील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची तयारी झाली आहे. २० डिसेंबरपासून शहरातील शाळा सुरू करण्याचे निर्देश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. याबाबतचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.
मार्गदर्शक सूचना