Advertisement

विराट-अनुष्काचं लग्न झालं की हो!


विराट-अनुष्काचं लग्न झालं की हो!
SHARES

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी अखेर विवाह बंधनात अडकली. इटलीतल्या मिलान इथं या दोघांचा विवाह संपन्न झाला. दोघांचं लग्न हिंदू पद्धतीनं झालं. काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे







लग्नासाठी इटलीची निवड का?

एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का शर्मानं म्हटलं होतं की, मी कधी लग्न केलं, तर इटलीच्या वाईन यार्ड इथं लग्न करीन. त्यानुसार इटलीमध्ये हा विवाह संपन्न झाला. वाईन यार्ड इटलीपासून चार तासांवर आहे. यार्डमध्ये जवळपास ५० पाहुणे राहू शकतात.




विरुष्काच्या लग्नाची चर्चा कशी रंगली?

गेल्या अनेक दिवसांपासून विराट आणि अनुष्काच्या लग्नाची चर्चा सुरू होती. ,१०,११ आणि १२ असे चार दिवस हा लग्नसोहळा रंगणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण अनुष्का शर्माच्या प्रवक्त्यानं लग्नाची बातमी फेटाळून लावली होती. अखेर ही बातमी खरी ठरली असून विरुष्का लग्नबंधनात अडकले आहेत.



१० डिसेंबरपासून सुरु झालेल्या श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेतून विराटला विश्रांती देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विराटनं बीसीसीआयकडे सुट्टीसाठी अर्ज केला होता. अर्जात विराटनं सुट्टीचं कारण खाजगी असल्याचं म्हटलं होतं. फक्त एवढंच नाही, तर अनुष्कानं डिसेंबरमध्ये शुटिंग करणार नसल्याचं निर्माता-दिग्दर्शकांना आधीच बजावलं होतं. त्यामुळे विराट आणि अनुष्का ही जोडी लग्न करणार या चर्चांना उधाण आलं. त्यात दोघांचं कुटुंब इटलीसाठी रवाना झालं. त्यामुळे त्यांचं लग्न होणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं.


हेही वाचा

अशी सुरू झाली विराट-अनुष्काची लव्हस्टोरी!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा