मुंबई - प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार मुंबईमधल्या आपल्या ग्लॅमरस आयुष्यापासून थोड्या काळासाठी दूर गेला आहे. अक्षयने मन:शांतीसाठी सध्या केरळ गाठले आहे. तिथे एका डोंगरावर राहून तो मनःशांतीचे धडे घेत आहे. वास्तविक मागचं वर्ष अक्षयसाठी खूप चांगले गेले. हाऊसफुल 3, एअरलिफ्ट आणि रुस्तम या तीन चित्रपटांनी मोठे यश मिळवले होते. तसंच यंदाच्या वर्षीही तो जॉली एल एलबी-2, टॉयलेट एक प्रेमकथा, 2.0, पदमन क्रॅक हे पाच चित्रपट करत आहे. त्यामुळे अतिकामाचा ताण येवू नये म्हणून अक्षय केरळला गेल्याचेही बोललं जात आहे. 15 दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर तो मुंबईला परतणार आहे.