Advertisement

'चला हवा येऊ द्या'ची पात्रं आता पुस्तक रुपात!


'चला हवा येऊ द्या'ची पात्रं आता पुस्तक रुपात!
SHARES

२५ डिसेंबरला वाचकदिनाच्या निमित्ताने अरविंद जगताप लिखित 'पत्रास कारण की...' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी डॉ. निलेश साबळे, सयाजी शिंदे, संजय जाधव, हेमलता अंतरकर, रमेश भाटकर, गणपतराव जगताप, सुदेश हिंगलासपूरकर, किरण येले इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

अरविंद जगताप यांची पत्रलेखन ही खासगी गोष्ट 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सर्वांची झाली आणि आता 'ग्रंथाली'मुळे ती पुस्तकरूपात अाल्याबद्दल यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी काहींनी अरविंद जगताप यांच्याबद्दलच्या काही आठवणी ताज्या केल्या.


या पुस्तकात काय?

अरविंद जगताप यांनी हिंदीमध्ये शेतकऱ्यांबद्दलचं पत्र काव्यात्मक भाषेत लिहिलं होतं. अनुपम खेर यांना ते प्रचंड आवडलं होतं. ते पत्र वाचून माझ्याही डोळ्यांत अश्रू आले असे अनुपम यांनी सांगितलं, अशी आठवण निलेश साबळे यांनी सांगितली.

'पत्रं ही आधीच्या काळी खूप जिवाभावाची गोष्ट असायची आणि अरविंदने आता पत्रांची जबाबदारी घेतली आहे. आजपर्यंतच्या निरनिराळ्या सिनेमांमधील त्याचे लिखाण खूपच अप्रतिम आहे, याचा मला अनुभवही आहे,' अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. 

'एक लेखक, कवी म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख आहेच. पण एक माणूस म्हणून कसं असावं, हे मी त्यांच्याकडून शिकत आलो आहे', अशी आठवण दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितली.

या पुस्तकाची मूळ किंमत १५० रुपये असून वाचकांना सवलतीत १०० रुपयांत ते उपलब्ध आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा