महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेड आरे कॉलनीत स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.एएनआयंनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.
एएनआयच्या सुञानुसार, त्यांनी सरकारच्या कायदेशीर टीमला आता मेट्रो कारशेड आरे कॉलनीत हलवण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयाला देण्यास सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारने ही जागा बदलून कांजूरमार्ग केली होती. याशिवाय या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांवर दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्यात आले होते.
Maharashtra Government has directed the state's Advocate General that the metro car shed will be built in Aarey itself. The side of the Government should be presented before the Court in this regard: Sources
— ANI (@ANI) June 30, 2022
आम्ही सत्तेत नसताना आरे कारशेड प्रकल्पाला विरोध केला होता, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. पर्यावरणाशी संबंधित असलेल्या लोकांनीही यावर आक्षेप घेत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. आता आम्ही हा प्रकल्प रद्द केला आहे.
या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हेही उद्धव सरकारने मागे घेतले होते. यासोबतच सरकारने आरेतील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली होती. हा प्रकल्प मागे घेतल्यानंतर येथील वनक्षेत्र 800 एकर इतके वाढले होते.
आरे कारशेड आता कांजूरमार्गला हलवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव यांनी केली होती. सरकारी जमीन असून तिचा वापर मेट्रो कारशेड बांधण्यासाठी केला जाणार आहे. आरेतील इमारत बांधण्यासाठी येणारा सरकारी खर्च अन्य चांगल्या कामांसाठी वापरला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव म्हणाले होते.
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्यासाठी ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने येथे झाडे तोडण्यास सुरुवात केली.
हा प्रकल्प भूमिगत कुलाबा वांद्रे मेट्रो कॉरिडॉरसाठी बांधला जात होता. हा प्रोजेक्टर बनत असताना देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र राज्यात सत्तापरिवर्तन होताच उद्धव यांनी या प्रकल्पाला पूर्णविराम दिला होता. पण आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी आल्यानंतर पुन्हा हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे.