गेल्या दोन महिन्यांत बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम ठिकाणांवरून 45 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला.
शहरात 4,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्या बांधकाम ठिकाणांची (construction site) नोंद झाली. 200 हून अधिक बांधकाम ठिकाणांना काम थांबवण्याच्या सूचनाही मिळाल्या.
पालिकेच्या (bmc) आकडेवारीनुसार घाणेरडे परिसर, कचरा जाळणे, बेकायदेशीरपणे कचरा टाकणे आणि ताडपत्री झाकण नसणे अशी 4,209 बांधकाम ठिकाणांची नोंद झाली.
- ऑक्टोबरमध्ये, अधिकाऱ्यांनी 3,195 प्रकरणे नोंदवली आणि 22,84,094 रुपये दंड वसूल केला.
- नोव्हेंबरमध्ये, त्यांनी 1,014 प्रकरणे नोंदवली आणि 22,26,442 रुपये दंड वसूल केला.
घनकचरा विभागाच्या भरारी पथकांनी याची तपासणी केली आणि दंड आकारला. अहवालानुसार, पथके शहरात सतत तपासणी करत आहेत. वारंवार उल्लंघन करणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल करण्याचा विचारही महापालिका करत आहे.
बांधकाम स्थळांवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या 28-सूत्री मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
नियम पुढीलप्रमाणे:
वाढत्या वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी महापालिका बांबू लागवडीच्या शक्यतेचा अभ्यास करत आहे.
या योजनेत रस्त्यांच्या कामांजवळील लहान जागा आणि मोठ्या मोकळ्या जमिनीचा समावेश आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी उद्यान आणि वृक्ष कार्यालयासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना बांबू लागवडीसाठी संभाव्य जागा शोधण्यास सांगितले.
सक्रिय रस्ते बांधकामाजवळील जागा आणि भविष्यातील विकास योजना नसलेल्या मोकळ्या जागा वापरण्याची कल्पना आहे.
बांबू गवत असल्याने चांगला वाढतो आणि माती धरून ठेवतो. बांबू लागवडीचा प्रकल्प जर का अंमलात आणला गेला तर ठिबक सिंचन वापरून त्याला पाणी दिले जाईल.
विविध भागात कोणत्या बांबू प्रजाती वापरल्या जाऊ शकतात याचा अभ्यास महापालिका करणार आहे. शहरातील वायू प्रदूषण (pollution) कमी करण्यासाठी प्रशासनाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा प्रस्ताव एक भाग आहे.
