नवी मुंबईत सोमवारी (१४ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३४२ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३१,००५ झाली आहे.
सोमवारी बेलापूर ४९, नेरुळ ५७, वाशी ७७, तुर्भे ५३, कोपरखैरणे ३३, घणसोली ३३, ऐरोली ३६, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ५४, नेरुळ ५७, वाशी ४७, तुर्भे ३९, कोपरखैरणे ३२, घणसोली २७, ऐरोली ३४, दिघामधील २ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६७७७ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६६५ झाला आहे.
नवी मुंबईत सध्या ३५६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत दीड लाख करोना चाचण्या करण्यात आल्या असून लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा दर हा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९ किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं ‘या’ विषयावर पत्र
बलात्काराच्या गुन्ह्यात ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक