परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणताना सोशल डिस्टंसिंगचेही कठोरपणे पालन केले जाईल आणि या विशेष उड्डाणांमध्ये केवळ 200 ते 300 प्रवाशांना बसण्याची परवानगी असल्याचे समोर आले आहे. एअर इंडियाने भारताबाहेर जाण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत चालविलेल्या फ्लाइटवर प्रवाशांचे बुकिंग सुरू केले आहे. दरम्यान आज देण्यात आलेल्या माहितीनुसार, 64 विशेष विमानांपैकी युएई मध्ये 10, कतार मध्ये 2 सौदी अरेबिया मध्ये 5, युके मध्ये 7, सिंगापूरमध्ये 5, अमेरिकेमध्ये 7, फिलिपाईंसमध्ये 5, बांग्लादेशमध्ये 7, बहरिनमध्ये 2, मलेशियामध्ये 7, कुवेतमध्ये 5,ओमानमध्ये 2 विशेष विमानं परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी पाठवली जाणार आहेत.
मुंबईत परत आलेल्या भारतीयांची तपासणी करून त्यांना या हाँटेलमध्ये क्वारंटाइन केले जाईल, तर वैद्यकिय अहवाल पाँझिटिव्ह आलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येईल.हॉटेल्समध्ये 14 दिवसानंतर कोरोना संक्रमित नसल्याचे आढळून आल्यावर प्रवाश्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येईल.विजय खबाले पाटील, पालिका प्रवक्ते