Advertisement

तौंतेनंतर आणखी एका वादळाचं संकट, पण...

देशासमोर आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.

तौंतेनंतर आणखी एका वादळाचं संकट, पण...
SHARES

अलीकडेच अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या तौंते चक्रीवादळाचा (Tautkae Cyclone) महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांना जबरदस्त फटका बसला आहे. यानंतर आता देशासमोर आणखी एका चक्रीवादळाचा (Another cyclone alert) धोका निर्माण झाला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण होतं आहे. पुढील काही दिवसांत या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD alert) देण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, तौंतेनंतर बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी या कमी दाबाच्या पट्ट्याचं २३ आणि २४ मे रोजी वादळात रुपांतर होणार आहे. या वादळाचं नामकरणही करण्यात आलं असून ओमाननं या वादळाला ‘यस’ (Yaas Cyclone) असं नाव दिलं आहे.

यस या वादळाचा देशाच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीला सर्वात जास्त धोका आहे. पण हे वादळ आपल्या पट्ट्यात आल्यानंतर अधिक ठोस माहिती देता येईल, असं भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ आणि २४ मे रोजी संभाव्य वादळ निर्माण होणार आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका अंदमान निकोबार बेटांना, ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसणार आहे. दरम्यानच्या काळात याठिकाणी १४० ते १५० किमी प्रतितास इतक्या वेगानं वारं वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अलीकडे आलेल्या तौंते चक्रीवादळाचा जबरदस्त फटका गुजरात आणि महाराष्ट्राला बसला आहे. या चक्रीवादळात एकूण १४ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अरबी समुद्रात अडकलेल्या एका जहाजातील अनेक खलाशी बेपत्ता झाले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याच काम अजूनही सुरू आहे.



हेही वाचा

Cyclone Tauktae: दुर्दैवी! समुद्रात बुडालेल्या बार्जवरील १४ जणांचे मृतदेह हाती, तर १८४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा