कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नसल्यानं महापालिकेनं तोंडावर मास्क लावणे, हात सतत धुवणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक केलं. परंतु, यामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या मास्क हा सध्या अत्यावश्यक असल्यानं त्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळं निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा, यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे.
राज्यात आता एन- ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. याबाबत राज्य शासनानं शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मूल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करीत आहे. शिवाय मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई देखील करीत आहे.
मास्कच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात यासाठी घेतलेल्या पुढाकाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. हॅण्ड सॅनिटायझर व मास्क यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यानं त्याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला पडत असल्याचं निदर्शनास आलं.
दरम्यान, सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं दर निश्चित करण्यापूर्वी उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली. उत्पादक, पुरवठादार व वितरक यांचं उत्पादन क्षेत्र, कार्यालय, गोदाम यांना प्रत्यक्ष भेट दिली तसेच उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची योग्य किंमत ही कॉस्ट ऑडिटर यांच्या सहाय्याने निर्धारित करण्यात आली आहे.
मास्कची किंमत निश्चित