हवामान खात्याने दिलेल्या संकेतानुसार मंगळवारी दुपारपासून मुंबईसहित महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील ६ तासांत धुवांधार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील पाऊस, लोकल ट्रेन सेवा, वाहतूककोंडी, पाणी तुंबण्यासंदर्भातील सर्व "लाइव्ह" अपडेट्स येथे मिळवा.।
वादळ असो किंवा वारा मुंबईकर प्रत्येक परिस्थितीला नेहमीच तोंड देत असतात. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांनी दादर स्टेशनचा आसरा घेतला आहे.
हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक येथील असल्याची अफवा पसरली होती. पण हा व्हिडिओ वांद्रे-वरळी सी लिंक येथील नसून अशा व्हिडिओकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
मच्छिमारांनी ४ आणि ५ डिसेंबर रोजी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे.
Juhu beach being evacuated as #CycloneOckhi causes #MumbaiRains @RidlrMUM#Mumbai #Maharashtra #India #rain pic.twitter.com/5AEG53E1xK
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) December 5, 2017
मंगळवारी दुपारी १२.४३ वाजता ४.३५ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या
#CycloneOckhi:Be Smart,Be Prepared!!! Follow these do's and don'ts of cyclone. pic.twitter.com/E3mRFcFyvv
— NDMA India (@ndmaindia) December 5, 2017
6 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने अनुयायी शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. पण ओखी वादळामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडला. यामुळे दादर येथे खोळंबा झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चैत्यभूमीला जाणारे सहा रस्ते बंद करण्यात आले आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्री ९ वाजता ओखी वादळ मुंबईच्या समुद्रकिनाऱ्या जवळून जाईल.
येत्या सात डिसेंबरपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन पालिका आणि मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे .
सोमवारी संध्याकाळपासून पडत असलेल्या पावसाने अजूनही विश्रांती घेतलेली नाही. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या नंतर मुंबईत आणखी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ओखी वादळामुळे मुंबईत सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. जराही विश्रांती नघेता मंगळवारी सकाळी देखील पावसाने हजेरी लावली. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २९ मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १२ मिनिटे उशिरा सुरू आहे.
या वादळाचा प्रभावामुळे मुंबईच्या वातावरणात बदल दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर या वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ओखी चक्रीवादळामुळे मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही दिसून आला. विमानाची ये-जा ४० मिनिटे उशिराने होत आहे.
ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. या चक्रीवादळामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मंगळवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. येत्या २४ तासांत आणखी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यभरात ओखी चक्रीवादळाचा परिणाम सोमवारी संध्याकाळपासूनच जाणवू लागला होता.
वादळ असो किंवा वारा मुंबईकर कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला नेहमीच तयार असतात. ६ डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिदिनामित्ताने मुंबईत दाखल झालेल्या अनुयायांनी दादर स्टेशनचा आसरा घेतला आहे.